Wednesday, 8 July 2015

रिकाम्या घरात आईनं करायचं काय?

  • First Published :
    Lokmat 09.07.2015
  • मुलं परदेशी शिकायला गेल्यावर जास्त पोकळी जाणवते ती आईला. साहजिकच म्हणा ! मुलं सतत आईभोवती असतात; तसंच आईचं जीवनही ही मूलकेंद्रित जास्त असतं. ब:याच जणींनी मुलांच्या संगोपनासाठी स्वखुशीने नोकरी सोडून पूर्णवेळ आई कम गृहिणी होणं स्वीकारलेलं असतं. त्यामुळे मुलं शिकायला बाहेर पडली की आईला पहिला प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे आता या रिकाम्या वेळेचं मी करू काय?   
    ब:याचदा अशा आया ‘एम्टी नेस्टर सिंड्रोम’ला बळी पडतात. आता आयुष्यात काही करायला नाही, रिकामपण कसं घालवायचं हा प्रश्न भेडसावतो. याचा परिपाक म्हणजे चिंता, चिंता आणि फक्त चिंता. सतत मुलांची काळजी आणि प्रश्नांचा भडिमार, सतत चौकश्या आणि बारीकसारीक गोष्टीत सल्ले. 
    ‘माझा मुलगा रोज अर्धा तास स्काइपवर असतो, जाताना त्याच्याकडून तसं प्रॉमिस घेतलं होतं’ - एक मैत्नीण अभिमानानं सांगत होती. 
    ब:याच आयांचा मुलांनी रोज स्काइपवर येऊन रोजचा अहवाल द्यावा असा अट्टहास असतो. पण अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे हेच अनेकदा त्यांच्या लक्षात येत नाही. मुलांना तिथं घरकामापासून जेवण, अभ्यासार्पयत सगळी कामं एकटय़ानं करायची असतात. परत तिथली अभ्यास पद्धती जरा वेगळी असते. मुलांना त्यासाठी खूप वाचन, नेट सर्च करून बरीच माहिती गोळा करावी लागते. याव्यतिरिक्त इंटर्नशिप आणि नोकरीसाठी शोध, अर्ज करणं, नेटवर्किग करणं, मुलाखतीसाठी तयारी यासाठी वेळ द्यावा लागतो. 
    तेव्हा रोज आपण मुलांचा किती वेळ घ्यावा याचा आईनं विचार करायला हवा. तसंही नंतर नंतर मग ‘काय खाल्लं’ या व्यतिरिक्त रोज बोलायला काही शिल्लक राहत नाही. मुलं पण कंटाळतात. यापेक्षा रोज व्हॉट्स अॅपवर मुलांची खुशाली घेऊन आठवडय़ातून एकदा अथवा दोनदा मुलांच्या सोयीनं स्काइपवर गप्पा मारणं जास्त सयुक्तिक ठरेल. 
    तसंही मुलांचे तिकडचे प्रश्न नुस्ते समजून नुसती चिंताच करत बसल्यास मुलं त्यांचे प्रश्न सांगणं बंद करतात. केवळ एक चिंतातुर आई न बनता मुलांची मार्गदर्शक, एक भक्कम आधार व जवळची खंबीर मैत्नीण बनण्याकडे भर द्यायला हवा. त्यामुळे त्यांना सतत सल्ले, सतत प्रश्नांची विचारणा, सतत काही ना काही भुणभुण हे सारं बंद करून टाकायला पाहिजे. 
    मुलं परदेशी गेली म्हणजे आपल्याला आता कायमची दुरावली वगैरे विचार मनातून झटकून टाकावेत. आजकाल नोकरीच्या निमित्तानेही मुलांना बाहेर घरापासून लांब दुस:या शहरात अथवा देशात जावे लागतेच. बदलत्या काळाचे हे सत्य मान्य करणं आणि आपल्या जीवनातला आनंदाचा झरा झुळझुळता ठेवणं आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपल्या रिकामपणावर आपण उत्तर शोधावं. स्वत:साठी काहीतरी आवडेल असं करावं.
    सोपं नाही हे तसं. पण या नाजूक अवस्थेतून जावं लागतंच. आणि मग काही वर्षानी घरटय़ातून उडून पिलू जेव्हा जबाबदार, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व होऊन आपल्याला भेटतं, भरारी घेण्यासाठी सज्ज झालेलं दिसतं तेव्हा त्याला खुल्या आकाशात मोकळं सोडण्याचा, पंखांना बळ देण्याचा आपला निर्णय योग्यच होता याची खात्नी पटते. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मुलांना जन्मभर तर आपण पुरणार नसतोच! त्यांना त्यांच्या जीवनप्रवाहात तरण्यासाठी, गगनभरारीसाठी तयार करणं हेच तर आईचं काम. ते तिनं केलं की आपल्या ओढाताणीचंही चीज झाल्यासारखं वाटतं!
     
    मोकळ्या वेळाचं आईनं 
    करायचं काय?
    1) रिकामा वेळ घालवण्यासाठी स्वत:ला कशात तरी गुंतवून घ्यावं. एखादा छंद जोपासावा.
    2) मुलांशी संपर्कात राहण्यासाठी, संवाद साधण्यासाठी  नवीन तंत्नज्ञान आत्मसात करावं. फेसबुक, व्हॉट्स अॅप शिकून घ्यावं.
    3) मुलांच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर पुढील शिक्षण घेणा:या हल्ली अनेकजणी आहेत. आमची एक मैत्नीण दर सहा-आठ महिन्यांनी कुठलातरी कोर्स पूर्ण केल्याचे मेसेज व्हॉट्स अॅपवर टाकत असते. 
    4) आयुष्यात आलेलं रिकामपण भरून काढण्याचा हा सकारात्मक प्रयत्न. आपल्याला हवं ते, आवडेल ते, राहून गेलेलं करावं. पूर्ण आनंदानं आहे ती परिस्थिती स्वीकारून अधिक आनंददायी पर्याय शोधावेत. आनंदी राहावे.
     कीर्ती कुलकर्णी
    ‘keerti.anulekhan@gmail.com

No comments:

Post a Comment