कीर्ती कुलकर्णी
मुलं परदेशी निघाली की,आधी स्वत:ला आणि मग त्यांना विचारायला हवं की, तिथल्या एकटेपणाचं काय करशील? स्वयंपाक येतो? मग काय खाशील? रोजचे खर्च, वेळेवर सगळं करण्याची शिस्त आणि स्वातंत्र्यात स्वत:ला सांभाळण्याची जबाबदारी. हे सारं कसं सांभाळशील?
------------
मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवताना संपूर्ण कुटुंबानं करायच्या मानसिक तयारीचा विचार आपण मागच्या लेखात केला. आता या लेखात आपण मुलांच्या तयारीचा थोडा वेगळ्या अंगानं विचार करून पाहू.
मनोधैर्य
मुलं दाखवत नसली तरी प्रथमच लांब एकटं जाण्याचं टेन्शन त्यांनाही असतंच. अशातच आता एकदा गेल्यावर निदान सहा महिने ते वर्षभर भेट होणार नाही या विचारानं सतत वाईट वाटून घेणं, आपण एकटं कसं राहणार याची सतत चिंता करणं या धास्तीनंही मुलांचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं. तेव्हा या विषयांवरच्या चर्चा आपण निदान मुलांसमोर तरी टाळायला हव्यात. आईवडील आपल्यासाठी बराच खर्च करत असल्याची जाण असण्याएवढी ही मुलं समजूतदार आणि प्रगल्भ असतात. पण ती या गोष्टींचं अवाजवी टेन्शन घेणार नाहीत हेदेखील पालकांनी पाहिलं पाहिजे. सकारात्मक विचार मुलांचे पंख अधिक बळकट करतात यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
त्यामुळे जाणं अगदी दोन दिवसांवर आल्यावर अचानक मुलांनी हातपाय गाळले तर सांगा त्यांना.
‘तुला तिथेही सगळा अभ्यास जमेलच, तेवढी तुझी पात्रता आहेच; पण यदाकदाचित त्या जागतिक स्पर्धेच्या महासागरात थोडं कमी पडलं तरी काही खूप फरक पडत नाही. गेलं म्हणजे अगदी जिंकूनच आलं पाहिजे असं थोडंच आहे? तिथली शिक्षण पद्धती, एकटं लांब जाऊन, राहून, सगळं पाहून येणं हेही एक शिक्षणच आहे, त्याचाही तुला खूप उपयोग होईल.’
खर्चाचं नियोजन
तिथे गेल्यावर मुलांना दैनंदिन खर्चाचं नियोजन करावं लागतं. मोबाइल बिल, घरभाडं, क्रे डिट कार्ड, त्यांची बिलं न विसरता वेळेवर भरणं, टॅक्सची कागदपत्रं वेळेवर सबमिट करणं ही कामं स्वत: करावी लागतात. तेव्हा शक्य असल्यास आधीपासूनच मुलांना बँक व्यवहार, बिलं भरणं अशा कामांची थोडी सवय करावी.
शिक्षणाच्या खर्चाव्यतिरिक्त दैनंदिन राहण्याचा खर्चही आपण उचलत असल्याची कल्पना मुलांना द्यावी. कारण शिकत असताना दर आठवडय़ाला काही तास काम करण्याची परवानगी असली, तरी लगेच गेल्या गेल्या सगळ्यांना नोकरी मिळेलच असं नाही. तसंच रोजचा खर्च उचलण्यासाठी नोकरीत वेळ आणि एनर्जी किती घालवायची, अभ्यासासाठी किती वेळ द्यायचा याचं गणित जुळवणंही महत्त्वाचं. तेव्हा सध्या अभ्यासाला प्राध्यान्य असून, पैसा कमावणं महत्त्वाचं नाही हे त्यांना सांगायला हवं. बचत अथवा काटकसर कशासाठी करावी आणि कशासाठी करू नये हे वेळोवेळी चर्चा करून पटवून द्यावं. कारण तिकडे आजारी पडणं अतिशय खर्चिक असतं. (आर्थिक आणि भावनिकदृष्टय़ाही.)
खाण्याच्या सवयी, वेळेचे बंधन
परदेशात राहायचे तर स्वत:ला शिस्त लावून घेणं अत्यावशकच. ठरल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर जाणं म्हणजे वेळेवर, अगदी ठरल्या वेळेच्या ठोक्याला पोहोचणो म्हणजे उशीर आणि ठरल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचणो अक्षम्य हे त्यांचं तत्त्व. वेळेच्या बाबतीत सगळे अगदी काटेकोर असतात. त्यामुळे ‘अरे ! थांब. हा आलोच, हे काय झालंच’ म्हणत माणसाला 10-20 मिनिटं ताटकळत ठेवण्याचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं वागणा:या आपल्याला ते वेळेचं बंधन पहिले आत्मसात करावं लागत. म्हणून मुलांना पहिल्यापासून वेळेची शिस्त लावलेली उत्तम.
परदेशात स्वत:चं जेवण स्वत: बनवावं लागत असल्यामुळे आधीपासूनच मुलांना जरु रीपुरता स्वयंपाक करायला शिकवणं उत्तम. जेवण करायला घरीच शिकवावं. कमीत कमी वेळात आणि कष्टात पोटभर व पौष्टिक काय खाता येईल हे मुलांना वेळोवेळी सांगत राहावं. अन्यथा वारंवार रेडी टू इट, न्यूडल्स, पिङझा, बर्गर खाऊन जाताना शिडशिडी शेलाटय़ा बांध्याची लेक सहा महिन्यात बर्गर साईज होते.
जगण्याचं नवं स्वातंत्र्य
गेल्याच आठवडय़ात अमेरिकेहून येताना माङया शेजारी तिथे शिकत असलेला एक भारतीय मुलगा सुट्टीसाठी घरी येत होता. विमान उड्डाण झाल्या झाल्या पठ्ठय़ाने हवाई सुंदरीला दारू कधी सव्र्ह करणार असं विचारलं! प्रवासात मनसोक्त दारू रिचवून झाल्यावर मुंबईला उतरण्याची वेळ झाल्यावर महाशय माउथ फ्रेशनरनं तोंड खळबळून मोकळे.
ब:याचदा इथे पारंपरिक, सामाजिक बंधनात वाढलेली मुलं तिथे अचानक पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर बेताल वागतात आणि घरच्यांना त्याचा थांगपत्ता नसतो. अनेक गोष्टींबद्दल दबलेले कुतूहल, आकर्षण, स्वातंत्र्य, मित्रपरिवाराचा दबाव, तिथली स्वैर राहणी या सर्वाचा तो परिपाक असतो. तेव्हा बदलत्या काळाप्रमाणो मुलांना योग्य तेवढं स्वातंत्र्य द्यावं जेणोकरून त्यांचे काही गोष्टींचे आकर्षण कमी होऊन चांगलंवाईट यातील फरक, त्यातील सीमारेषा कळेल. म्हणून मुलांशी मित्रत्वाच्या नात्यानं संवाद असणं गरजेचं आहे.
एकटेपणा
आयुष्यात एकटेपणासारखं दु:खद व भयावह काही नाही. कधी न कधी त्याला तोंड द्यावे लागतेच. अमेरिकेसारख्या समृद्ध देशाला जणू एकटेपणाचा शापच आहे. इथे जाण्यापूर्वी आपल्याला एकटं राहायला लागू शकतं ही खूणगाठ प्रत्येकाने बांधावीच. त्या तयारीतही असावं. इथून जाताना जरी मित्रमैत्रिणी रूममेट्स म्हणून असले, तरी नंतर नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरांत ते जाऊ शकतात. अशावेळी कुणी रूम पार्टनर मिळाला नाही तर एकटं राहण्याशिवाय पर्याय नाही. या सा:याची मानसिक तयारी करून घेतली, जाणीव असली की मग घेऊ द्यावी खुशाल भरारी!
keerti.anulekhan@gmail.com
No comments:
Post a Comment