अचानकच अघटीत घडून जात
`का' हा प्रश्न सर्व व्यापुन उरतो
एकमेव उत्तर `नियती' हेच असतं
जर तर च्या विचार गुंत्यात
माणुस आपली अगतिकता अधोरेखित करत रहातो.
***********************************************************************************
`का' हा प्रश्न सर्व व्यापुन उरतो
एकमेव उत्तर `नियती' हेच असतं
जर तर च्या विचार गुंत्यात
माणुस आपली अगतिकता अधोरेखित करत रहातो.
***********************************************************************************
बदल
बदल, अशाश्वत जगातील शाश्वत गोष्ट
नव्या पिढीचा जीवनमंत्र, सळसळत्या तारुण्याचा अमृतकुंभ
बदलाव स्वतःला, प्रवाहाशी मिळत जुळत घ्यायला
कधी बदलावा प्रवाह ही, नवी क्षितिज रेखाटायला.
बदला आचार, बदला विचार, आणि सर्व समाज
बदलू नका जीवनमुल्ये आणि आपली नाती.
***********************************************************************************
माणुस आणि पक्षी
प्रत्येक चिमणीला एक चिमणा आवडतो,
प्रत्येक चिमण्याच्या मनात एक चिमणी भरते.
झटून दोघे घरकुल साकारतात,
भावी आयुष्याचे चित्र रेखाटतात.
पिल्लू दोघांना प्राणप्रिय असतं,
कारण ते दोन श्वासांचा एक श्वास असतं.
पिल्लाला नवीन आकाश दाखवण्यासाठी चिमणा चिमणी झटत रहातात
विस्तारीत क्षितिजा बरोबर दुराव्याचे पदर येतात,
कालची नाती रक्तापेक्षा जास्त जवळची वाटू लागतात.
उबदार घरटयात जीव कोंडतो,
पिलू घरटे सोडून जातो
चिवचिवणारे घरटे छोटे उदास एकटे खायला उठते
माणसांपेक्षा पक्षी शहाणे.
पिलु उडायला शिकल्यावर आपणहुन घरटे मोडून टाकतात
माया, बंध, पाश यांचा चिरा स्वतःच उखडून टाकतात
संतांप्रमाणे पक्षी शिकवतात मार्ग खरा सुखाचा,
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय ठेवा मोकळा.
***********************************************************************************
nice poem
ReplyDeletesurekh..jivanache satya manasala kadhi samajanar?
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete